Thursday 18 September, 2008

वडापाव --प्रफ़ुल्ल

BE ची डिग्री हाती पडली पण नोकरी कुठे मिळेना
हजार अर्ज कंपनीला लिहली पण उत्तर काही येइना.

शेवटी जीव माझा वैतागला
काम करण्यास धडपडला
ओलांडून एक नाला
दिसला वडापावाचा ठेला

नोकरी इथ मिळवण्यासाठी अर्ज मी केला.
मुलाखत पुढच्या आठवड्यात आहे
म्हणुन सुटकेचा निश्‍वास टाकला

माझ्यासह आठजण मुलाखतीला आले
प्लेटधुन्यापासुन वडापाव विकण्यापर्यंतचे
सर्व प्रश्‍न त्यांनी मला विचारले
त्या सर्व प्रश्‍नाची मी समाधानकारक उत्तर दिले.

इतर मुलांपेक्षामाझीच उत्तर चांगली ठरली
म्हणुन ’जय मोगँम्बो बाबा वडापाव सेंटर’ मध्ये
नोकरी मला मिळाली.
उपासमारीमुळे नोकरीची सुरुवात दुसर्‍यादिवसापासुनच मी केली

काहीका होइना डिग्री च्या कागदाचा एकच उपयोग झाला
वडापाव च्या गाडीवर फ़्रेम करुन लटकवला.

(आता....... )
भरदुपारी वडापावाची गाडी मी लोटतो
’वडापाव लेलो’ ’वडापाव लेलो’ पण त्याबरोबर
जोरजोराने ओरडतो

वडापावावर मी अवलंबी झालोय
संध्याकाळी शंभरची नोट खिशात घालतोय
आणि पोटाची भुक पण वडापावानेच
शांत करतोय.
वडापावच आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक
झालाय
म्हनूनच माझ्या झोपडीच नाव मी ’वडापाव कुटी’
ठेवलय.

सुरुवातीला मला वडापाव विकण्याची लाज वाटत होती
पण काय करणार बेरोजगाराची झळ सर्वांनाच लागली होती
त्यामुळेचतर माझे बरेच वर्गमित्र बाजारात भाजीपाला
विकत होती.

Monday 15 September, 2008

माझी स्वर्गाची यात्रा (भाग -३) --प्रफ़ुल्ल

इथला सर्व कारभार मंत्रानीच चालतो. म्हणजे जेवन पाहीजे असेल तर पदार्थाच नाव मंत्रात उच्चारायच पदार्थ लगेच हजर.मग मी मंत्र म्हणन्याचा प्रयत्‍न केला. मी ’ओम गुलाबजामुन नम: म्हणालो तर एक गुलाबजामुन जमीनीवर हजर झाला.मग फ़ुंकणीरावांनी सांगीतले की किती पाहीजे व कशात पाहीजे ते पण त्यात उच्चारयचे.मग मी मंत्र सुधरवून म्हणालो ’ओम गुलाबजामुन५० पातेलीत नम: ’ तेव्हा कुठे ते गुलाबजामुन पातेलीत आले.गुलाबजामुन बरोबर मनसोक्‍त वेगवेगवेळे पदार्थ खाल्ले.मग काय नुसती मज्जा.फ़ुंकणीरावांनी मला थोड्याथोड्या गोष्टी सांगीतल्या.त्यामुळे थोडेफ़ार मंत्र मला तयार करता येत होते .आणि बाकीची माहीती तुला बंडु सांगेल. अस ते म्हणाले होते.बंडु हा त्याचा मावस भाऊ होता.आणि २० तासांनंतर भॆटणार होता.इथ सुर्य चंद्र वैगरे आपल्याला हवे तसे आपल्या वातावरणात फ़िरवता येतात.कारण सभोतालचे वातावरण आपणच निर्माण केलेले होते.आता थोड झोपुन घ्याव अस वाटल मग घेतला मंत्र ’ओम रात्रीहो नम:’ क्षणार्धात काळोख झाला.आणि मी झोपी गेलो.
६.
किती वेळ झोपलो होतो माहीत नाही.वेळेचे भान रहावे म्हनून एक घड्याळ सकाळ करण्यापहीले हातात घातले.मग त्यानंतर सकाळच्या वातावरणात चहा पित होतो.समोर T.V आणला पण स्वर्गात ’संस्कार १’ आणि ’आस्था ५’ या channel शिवाय कोणतेच channel लागत नव्हते मग काय़ T.V बंद करुन दिला.मग बाहेरची वातावरणनिर्मीती करु लागलो.असंख्य कलप्ना सागरात मी बुडुन गेलो होतो. आणि त्या मी अस्तित्वात आणत होतो.इतक्यात कोणीतरी क्षणात डोळ्यासमोर दॄष्य झाले.
मी त्याला काहीतरी विचारणार त्या पहीलेच तो म्हणालो.
"मी बंडु मला फ़ुंकणीरावांनी पाठवले आहे "
"हो त्यांनी मला तुमच्या बद्‍द्ल सांगीतले होते"
मग हळुहळु आमची ओळख वाढु लागली. आम्ही एकाच वयाचे होतो त्यामुळे मोकळेपणाने गप्पा आम्ही मारु लागलो.त्याने मला विचारले.
"तुझे शिक्षण काय झाले"
" BE COMPUTER झालोय"मी मोठ्या अभिमानाने सांगितले. पण त्यावर बंडू जोरजोराने हसु लागला आणि हसता हसता म्हणाला
" काssssय BE ssss ...तुझssss वय 21 आणि तु फ़क्त BE केलीय ssssss"त्याच हसण्याचा आणि मला असं बोलण्याचा फ़ार राग आला. अस वाटल याच्या दोन गालात द्याव. याला काय माहीत BE व्हायला किती आटापिटा करावा लागतो जिवाचे काय हाल होतात.पण मला तस काही करता नाही आलं.काय करणार तो होतो पुंजर्क म्हणजे देवा नंतर पुंजर्कानाच तिथे मान होता.स्वर्गात फ़क्त पुंजर्क आणि देवच जिवंत होते आणि आता मी.
मी त्याला तोच प्रश्‍न विचारला "आणि तुझ शिक्षण काय झालय",
"मी BKABFZ झालोय "
"काय?"
"म्हणजे बस कर आता ब्रेन फ़ुल झाला."
"ही कोणत्या प्रकारच शिक्षण आहे ?"मला वाटल हा माझी चेष्टाच करतोय.
"इथ आम्हा पुंजर्काना जन्मापासुन शिक्षण दिले जाते.BE ची पदवी आम्ही वयाच्या पहिल्या वर्षीच घेतली होती त्यात सर्व शाखाची पदवी आली.नंतर दुसर्‍या वर्षी वैदकीय शिक्षण घेतले होते त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत मी पदव्याच घेत होतो पण नंतर मेंदु मध्ये साठवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती मग मला ईद्र देवांनी BKABFZ ची पदवी दिली.मी मेंदु ची जागा वाढवण्यासाठी ब्रम्हदेवांना अर्ज केलाय त्यांचे उत्तर अजुन आल नाहीय पण १-२ वर्षात येईल" त्याचे हे बोलणे ऎकुन आता मलाच माझी लाज वाटु लागली.म्हणुन मी ह्यानंतरचा विषय टाळला.
काही वेळापुर्वी पुस्तक वाचण्याची इच्छा मला झाली होती,ती मी त्याला सांगितली "बंडू मला काही पुस्तक वाचायला मिळ्तील का?,काही वेळापुर्वी मी पुस्तक आणण्याचा प्रयत्‍न केला होता पण तो पुरता फ़सला.मी म्हणालो ओम छावा नम: तर वाघाच पिल्लु समोर आल माझ्यावर झेप घेणार होता पण तितक्यात त्याला गायब केल मरता मरता वाचलो."
बंडू माझे बोलणे एकुन हसू लागला.मला त्याच्या हसण्याचा तसा थोडा राग आला. पण त्याच्या बोलण्यानंतर मी पण माझ्या बोलण्यावर हसलोच. तो म्हणाला होता."स्वर्गात मरण्याला घाबरणारा तु पहिलाच... ". स्वर्गात मेल्यावर स्वर्गातच जागा मिळते हे मी विसरुनच गेलो होतो.
पण माझा पुस्तकाचा प्रश्‍न तसाच राहीला होता मी बंडूला आठवण करुन दिली.त्यावर बंडु म्हणाला.
"पुस्तक वाचण्याच्या दोन पद्‍धती आहेत.प्रत्यक्ष वाचन आणि अप्रत्यक्ष वाचन"
"प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष वाचन ???"
"प्रत्यक्ष वाचन म्हणजे तुम्ही पृथ्वी वरचे लोक पुस्तक वाचता तसे आणि दुसरे म्हणजे अप्रत्यक्ष वाचन त्यात ’डोक्यातघाल’ नावाच्या मशिनी मध्ये डोके घालायचे आणि पुस्तकाचे नाव मंत्रात घ्यायचे २ सेंकदात पुर्ण पुस्तक वाचले जाते."
असं होय तर!!!! म्हणुन हा bkabfz पदवी वर इतक्या उड्या मारत होता.तेच म्हटल BE च्या एका शाखेचं शिक्षण घेण्यासाठी चांगल्याचांगल्याची वाट लागते तिथ हा वयाच्या पहिल्याच वर्षी सर्व BE च्या शाखेतील पदवी मिळवतो.
रोज काहीनाकाही गोष्टी माहीत पडत होत्या, हजारो प्रश्‍न पडत,मन संभ्रमीत होत असत. हे जग तर मायावीच होत.प्रत्येक दिवशी काहीतरी अद्‍भुत आणि विचीत्र गोष्टी माहीत पडत होत्या अजुन स्वर्गाची संकल्पना थोडीशी सुद्धा माहित झाली नव्हती. स्वर्गाचा आणखी बराच प्रवास बाकी होता.

Monday 8 September, 2008

वाघाची वाट --प्रफ़ुल्ल

वाघ मोजण्याची जबाबदारी एकदा माझ्यावर पडली
हे काम करण्यास ’वाटबघावाट’ जंगलाची वाट मी धरली.

रानोरान तुडवू लागलो चार दिवस शोधुन थकलो.
मनात वाटले फ़िरुन जावे वाघाची संख्या झिरो आहे.

तितक्यात एक डरकाळी वाघाची आली.
फ़िरवुन पाठ त्या दिशावर वाटचाल मी केली.

दिसले दृश्य अद्‍भुत होते एक वाघ
दोरीच्या फ़ासाजवळ उभा होता
अरे बापरे तो तर आत्महत्या करण्यास तयार होता.

वाघा वाघा थांब जरा प्राण नको देऊ
वाट्टेल ती मदत करतो पण फ़ाशी नको घेऊ

डोळे त्याचे फ़िरले मला पाहुन चमकले
दोन पाऊल पुढे आला आणि
मला गर्जून म्हणाला.

"तुम्ही मानवाने माझे दोन बंधू मारले.
तीन मामाना पिंजर्‍यात डांबले.
दोन काका शहर पहायला गेले ते
कायमचेच गेले.
बाकी दोन भाऊ ते सर्कशीत नाचण्यास नेली.
या जंगलात फ़क्‍त माझीच चिता रचायची राहीली
म्हनून माझ्या मनाची ठिंणगी पेटली.
ह्यामुळे मी प्रतिज्ञा घेतली की,

या जंगलात मी एका माणसाचा अंत करेल.
तरच पुढच जीवन जगेल

आठ दिवसापासुन एक माणुस इथ नाही फ़िरकला
माझ्याकडे पाहुन तो बोलला बर झाल तु आला.
माझ्या आत्महत्येचा प्रसंग टळला"

हे ऎकुन भान माझे हरपले
दिवसाढवळ्या तारे डोळ्यासमोर चमकले.
त्याने झेप घेण्यापहिले मीच माझे शब्द फ़ेकले.

वाघा तु येडावतोय नऊ जणांचा बदला
तु एकावर निभावतोय
माझ ऎक एक दिवस बघ वाट
तुझ्या बदल्यासाठी आणखी माणसं आणतो आठ

या मतावर मान हलवून संमती त्याने दिली
पटक्यात तिथून परतीची वाट मी धरली

मग वाघ बघत राहीला माझी वाट
वाट बघता बघताच लागली वाघाची ’वाट’

तिसर्‍या दिवशी बातमी पेपरात छापली
’वाटबघावाट’ जंगलाची वाघ संख्या झिरो झाली.

Monday 1 September, 2008

माझी स्वर्गाची यात्रा --प्रफ़ुल्ल (भाग -२)

.
जाग आली तेव्हा मी एका भव्य राजमहालात होतो. रंगीबेरंगी असलेल्या बिछान्यावर पहुडलो होतो. सुगंधी अत्तराचा वास येत होता.राजमहल सुंदर पणे सजवलेले होते अस वाटत होत की आपण जुन्या काळाच्या राजवाड्यात तर नाही ना आलो.उठुन लगेच मी दरा बाहेर डोकावले ,बघतो तर काय सर्वीकडे भव्य इमारती होत्या.वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या झाडांनी त्या इमारती आणखीनच खुलुन दिसत होत्या.आकाश निळेच होते .ते वेगवेगळ्याप्रकारच्या वस्तुनी सजले होते त्या वस्तु काय होत्या त्याची नाव मला माहीत नाही त्या आकाशात अधांतरी लटकलेल्या होत्या पण त्यांनीच आकाशाला खुपच सुंदर बनवले होते .जितके वर्णन करावे तितके कमीच होइल.पण ह्या सर्व गोष्टी मुळे माझे डोळे दिपुन गेले होते. खर तर माझ्या डोळ्यावर माझा विश्‍वास बसत नव्हता.मग खात्री पटली की खरच हे स्वर्ग आहे..इतक्यात बाहेरच्या आकाशात इंद्रधनुष्य तयार झाले अरे बापरे हे तर जवळ-जवळ ४० ते ५० रंगाचे होते.काही रंग तर मी अजुन पर्यंत पाहीले नव्हते.त्यातले ४-५ रंग पृथ्वीवर अस्तीत्वातच नव्हते.मला तर newton च्या prism therom ची आठवण आली.त्याने पाहिले असते तर चक्कर येऊन खाली पडला असता किंवा बहुतेक वर पडला असता. नाही खालीच पडला असता, समोरच्या आंब्याच्या झाडाखाली सफ़रचंद पडले तेव्हा मी माझे मत पक्के केले.बर झाल निदान GRAVITY चा नियम तरी स्वर्ग ने मोडलेला नाही. नाही तर new-ton च काय झाल असत?.पण आब्यांच्या झाडाला सफ़रचंद कसे?सर्व विज्ञानाच्या नियमाची धुळाधुळ उडवाणार्‍या त्या वातावरणाकडे मी एकटक पणे पाहत होतो.
पण मला तर कृत्रीम शरीर मिळणार होते पण माझ्यातर काहीच बदल झालेला नव्हता ?किती वेळ मी बेशुध्द होतो?आपले त्यानंतर काय झाले?नेमक त्या मशिन मधुन आपण कसे काय इथे पहोचलो असे एक ना अनेक प्रश्‍न मला पडु लागली कोणाला विचारावे तर आजुबाजुला कोणीच दिसत नव्हत.इतक्यात मागुन आवाज आला.
"अहो ... महाशय .."
मी मागे वळुन पाहीले.राजवस्त्र आणि सोन्याचे अलंकार घातलेला एक मनुष्य माझ्या पाठीमागे उभा होता.लागलीच त्याने वाकुन नमस्कार केला मला वाटल की इथला हा रीतीरिवाज असेल म्हनुन मी ही त्याला वाकुन नमस्कार केला. मी त्याला विचारले."आपण....".
"मी फ़ूंकणीराव गंजलेले तुम्ही आमचे पाहुणे मला लुंगी बाबानी आपल्या बद्‍दल सांगीतले आहे.".मला असंख्य प्रश्‍न पडलेले होते.त्याने मन येडेपिसे झाले होते.मला राहवले गेले नाही त्याना सरळ विचारले
" मी तर एका मशिन मध्ये गेलो त्यानंतरच मला काहीच आठवत नाही.मला तर कृत्रीम शरीर मिळणार होते पण माझ्यात तर काहीच बदल दिसत नाही"
"हो सर्व बरोबर आहे. त्या मशिन मध्ये गेल्यानंतर,काही मंत्रानी तुमचे मन,ऋदय,आणि मन बाजुला केले गेले आणि ’स्वर्गलीगी’ मंत्रामध्ये या अवयवांच्या वजनाचा उच्चार झाला आणि ते मशिन सुरु झाले तुमचे तिथले शरीर बाजुला टाकले गेले आणि स्वर्गाच्या द्वारापाशी येताच तुम्हाला कृत्रीम शरीर दिले गेले.ते हुबेहु तुमच्या तिथल्या शरिरासारखेच. तिथुन मी तुम्हाला या राजमहालात आणले. ".
"पण इथ शरिरवाटपची काय गरज ?सरळ आले तर नाही का चालणार?"
"बघा माणुस मरतो तेव्हा त्याच्या कर्मानी स्वर्ग किंवा नर्क गाठतो पण तो मेल्यावर त्याचे शरिर मेल्यावर. फ़क्त त्याचा आत्माच या स्वर्गात किंवा नर्कात प्रवेश करतो. स्वर्ग म्हणजे सुखाची जागा आणि नर्क म्हणजे दु:ख. स्वर्ग म्हणजे वाटेल त्या सुखसुविधा आणि नर्क म्हणजे दिर्घकाळ यातना.पण मला सांगा आत्म्याला कसले आले सुख आणि दु:ख .त्याला कितीही यातना दिल्या किंवा सुख सुविधा दिल्या तरी आत्म्याला काय फ़रक पडणार म्हनून यावर तोडगा ब्रह्मदेवांनी शोधला. की त्यांना द्‍वारापाशीच कृत्रीम शरिर देण्यात यावे.सर्व मृतांना इथ आल्यावर शरिर दिले जाते त्याना मागच्या जन्माचे काहीच आठवत नाही.पण तुम्हाला जीवंत आणायाचे म्हणुन तुमचे महत्त्वाची अवयव इथ आणली गेली आणि कृत्रीम शरीर दिले गेले."त्याच्या या स्पष्टीकरणांने माझे काही प्रश्‍न सुटली पण बरीच प्रश्‍न जसे च्या तशीच होती.
"बाहेरील थक्क करणार्‍या गोष्टीनी मला बुचकाळ्यात पाडले आहे."
"तुम्हाला आणखीन भरपुर गोष्टी माहीत व्हायच्या आहेत . तुम्ही जे बघता आहेत ते वातावरण प्रत्येकाला सुरुवातीला निर्माण करुन दिले जाते नंतर ते स्वत: विकसीत करायचे असते तुम्ही जे वातावरण बघता आहेत ते वेगळे आहे आणि मी बघतोय ते वेगळे आहे मला तर आजुबाजुला मोठमोठाले हिमालाय दिसताय संथ वाहणारी नदी समोर दिसते आहे"तो बोट समोर दाखवुन बोलत होता मी पाहीले तर समोर सपाट जमीनीवर उगवलेले वृक्षच दिसत होते.

क्रमश:

Friday 8 August, 2008

माझी स्वर्गाची यात्रा --प्रफुल्ल (भाग -१)

स्वर्ग आणि नर्क या कल्पनेने मला एकदा फ़ार पछाडले.मग या गोष्टीचा छडा लावायचा मी ठरवल.गोष्ट तशी सोपी नव्हती पण प्रयत्‍न केल्यावर काय नाही होत.
म्हनुन गावोगाव फ़िरलो बरेच आश्रम छानले.बर्‍याच साधुबाबाना भेटलो. तेव्हा मला भेटले ह.भ.प. लुंगीवर चूंगी बाबा.खरे तर ते साधुबाबा कमी आणि scientist जास्त होते.म्हनुन तर त्यानी वेगवेगळ्या प्रकारची मशिन बनविले होती.
ते स्वर्ग व नर्कातील"Associations of workers of swarg and nark" यातील एका कर्मचार्‍याशी गुप्तपणे संधान साधुन होते हे मला गुप्तपणे समजले.मी त्याच्याकडे स्वर्गात जाण्यासाठी आग्रह धरला पण ते एकेनाच पण मी ही माझी लांबण सुरुच ठेवली.सरते शेवटी लूंगीबाबा त्याचा शिष्य मुन्नाभाई राजु जलेला जो एके काळचा underworld don होता त्याला म्हनाले ."जर मी याला स्वर्गात नाही पाठवले तर याच्यामुळे मी नक्कीच स्वर्गात जाईन."
त्या मुन्नाभाईला पण या बाबानीच नर्क दाखविला होता म्हनुन तर त्याने underworld ची लाईन सोडली होती.
पण काही का असेना मला या शुक्रवारी स्वर्गात जाण्याची संधी मिळणार होती.शुक्रवारी स्वर्गाचा तर शनिवारी नर्काचा बाजार भरत असे.

२.
चला आज मी स्वर्गात जाणार ते पण जिवंत.
मोबाईल वैगरे charging करुन घेतला होता. फ़ोटो आणि कँमरा पण घेतला होता.
आता फ़क्त जेवणाची व्यवस्था करायची राहीली होती कुणास ठाऊक तिथे खायला मिळते की नाही.
या विचारत असतानाच एक आवाज आला " ओ ओ .... हा फ़ोर्म भरा" मुन्नाभाई माझ्याकडे ओरडत म्हाणाला.
मी फ़ोर्म भरायला सुरुवात केली.
१) नाव,पत्‍ता,जात,फ़ोन नं न सांगता खालील माहीती भरा.
२} तुमच्या मागे पुढे कोणी असेल तर त्याची जबाबदारी आमची नाही
३)खालील अवयवांची वजन लिहा.
१. मेंदु : ______
२.‌ऋदय : ______
३.मन : ______
मी हा पर्याय पाहताच आश्‍चर्याने मुन्नाभाईकडे पाहुन म्हणालो
"काय हो मी दोन वर्षा पासुन माझ्या पूर्ण शरिराच वजन नाही केल आणि तुम्ही चक्क मला
वेगवेगळ्या अवयवाच वजन करायला सांगतात आणि त्यात मनाचही वजन करायला
सांगताय. तुम्ही कधी मेंदु,ऋदय,मन याच वजन केलय का? काही तरी काय सांगताय"
मुन्नाभाई आग्रहाने बोलला "वजन तर करावेच लागेल"
"मग द्या तराजु काटा आताच मोजतो" मी रागाने बोलायला लागलो.अस वाटायला लागल की हे मला
बनवताय.
"अहो तुम्हाला काही तराजु काट्‍यात वजन नाही करायच एक छ्मटम नावाच मशिन आहे त्यात करायचय" मुन्नाभाई म्हणाला.
"हे शक्य आहे?पण याची गरज काय?" माझा प्रश्न.
"हो नक्कीच शक्य आहे.आणि तुमचे फ़क्त इतकेच अवयव स्वर्गात जातील.बाकी कृत्रीम शरीर तिथे गेल्यावर दिले जाईल. त्यासाठी या गोष्टीच वजन घेणे गरजेचे आहे..आणि बाकी प्रश्‍नाची उत्‍तर तिथेच मिळतील समजल का? " मुन्नाभाई अस बोलुन निघुन गेला.
पण त्याने सांगितलेल्या गोष्टी वर कसा विश्वास ठेवायचा?मी बराच वेळ विचार करत होतो माझ मन माझ्या शरिरात कुठे आहे हे मला माहीत नाही हे तर त्याच वजन करायला जाताय.कस काय शक्य आहे?.पण या प्रश्नाच उत्‍तारासाठी मला जास्त वेळ बसाव लागल नाही. मी एका गोलाकरात मशिनी मध्ये गेलो मध्ये काय झाले मला माहीत नाही पण मी सहीसलामत होतो एवढेच!!!.त्यात मनाच वजन होत : ०.०९८३X10^ -890 kg..

३.
त्यानंतर मला एका गोलाकार त्रीकोनी मशिन मध्ये नेण्यात आले. आणि पुढे अंधकार..............................................


क्रमश:

Sunday 3 August, 2008

माझ्या व्याख्या

विद्यार्थी :- अभ्यासाशिवाय सगळ्या गोष्टी मध्ये रस असणारा जीव

अभ्यास:- परिक्षा पास होण्यासाठी केला जाणारा आटापिटा


मन :- अशी गोष्ट ज्याची व्याख्या करता येणे कठीण आहे.
(ही पण एक व्याख्या झाली हाss हाss हाss ...)

कॉलेज:- लेक्चर सक्‍ती चे असतील तर एक कैदखाना.
नाहीतर..............(काही अनुभव नाही म्हणून काही सांगता
येणार नाही)


आत्महत्या

--प्रफ़ुल्ल
प्रेमभंग झाला कारण खिशात दमडी नव्हती
या घटने मुळेच आत्महत्या ची कल्पना मला सुचली

गळफ़ास घेउ की नदीत जीव देऊ
विष घेऊन मरु की जळुन मरु

एका पाठोपाठ सर्व प्रयत्‍न केले
याच प्रयत्‍नात माझे हसे झाले

गळफ़ास घेताना दोर हा तुटला
हात फ़ँक्‍चर होऊन गळ्यात माझ्या पडला

नदीत द्यायला गेलो जीव तेव्हा पाणी कमी होते
म्हणुनच उडी मारल्यावर डोके माझे फ़ुटले

विष नाही भेटले म्हनुन कोकाकोला पेप्सी मी पिले
मरण नाही आले पण जुलाब सुरु झाले
(त्याच्यामुळेच दोन दिवस माझे हाल झाले)

रॉकेल आणण्यापहिले तुडवडा याचा पडला
जळन्याबरोबर मरण्याचाही प्रयत्‍न मी सोडला.

कारण मला समजल की प्रेमात जीव का देता
ते तर खर्‍या अर्थी कंटाळुन आत्मह्त्या करता.

Thursday 31 July, 2008

प्रियसीचा कुत्रा
-प्रफ़ुल्ल

प्रियसीचा कुत्रा हा मी आल्यावरच भुंकतो
वाटत असते तिला भेटायचे पण
कुत्रा मध्ये तडमडतो

मारली होती लाथ त्याच्या कंबरड्यात
भुंकुन त्याने मलाच पाडले डबक्यात

आता त्याच्यावर दया नाही
दे‌‌ईल त्याला सजा कारण
त्याने प्रेमाची घातली माझी मजा

आज संध्याकाळी घे‌ईल त्याला पट्यात
घे‌ईल त्याचा जीव एका झटक्यात

जेव्हा माझी योजना प्रियसीला समजली
गालात माझ्या एक देऊन तडकन निघुन गेली

प्रेमभंग झाला कशामुळे ??????
एका कुत्र्यामुळे

ही लज्जास्पद घटना माझ्या आयुष्यात घडली
‌इथुन पुढे एक सवय मला जडली

कुत्रा नसेल जिच्या दारी
तिच्यावरच प्रेम करेल भारी.

Wednesday 30 July, 2008

प्रेमाचा संन्याशी -- प्रफ़ुल्ल

प्रेमाचा कोणतातरी मार्ग तुम्ही दाखवा
आतातरी तुमच्या भक्ताची व्यथा दुर करा
(असे एकुन )
साधुबाबा उठले आणि म्हनाले

"प्रेमाचा सुगंध आहे जो तुझ्या मनात
निघेल तो एका क्षणात,उत्तर तुझे
मिळेल एका स्मशानात"

सुटबुट घालुन गेलो मी स्मशानात
अंधाराची काळी रात्र होती आभाळात

घाबरत घाबरत पाऊले माझी पडली
‌‌इतक्यात कडाडून विज आभाळत चमकली
चिली मिली गिली म्हनत एक चेटकीन पुढे आली
घडली व्यथा तिला सांगितली पण झाले उलटेच
ती चेटकीनच माझ्या गळे पडली

प्रेमकर माझ्यावर मीच तुझी राणी
वाक्य तिचे ऎकताच आली मला ग्लाणी
हे बघ चेटकीनी असली जरी तु कानीबानी
तरी भेटेल तुला दुसरा कुणी
वाट सोड माझी तु नाही ग माझी राणी

हे बोल माझे ऎकता संताप तिला आला
फ़रफ़टत फ़रफ़टत नेऊन तिने मला एका
कबरीवरती सोडला
‌इतक्यात एक पाटी कबरीवरती दिसली
वाक्य ती वाचायला सुरवात मी केली

" प्रेमाचा शोध घेणार्‍या येड्‍यानो
येऊ नका या मार्गी काहीकेलेतरी
स्मशानच लागेल तुमच्या नशिबी "

वाचुन हे सारे अर्धमेला मी झालो
धावत पळ्त पुन्हा साधुबाबा कडे गेलो
(आणि मग काय?)
त्यांच्या बाजुला चटई टाकुन मी पण
साधुबाबा झालो.

चारोळी

हजार मोती मातीत मिळाले
अंकूर बनुन जन्मास यावे
ऊन नाही वारा नाही
कित्येक प्रयत्‍न यश मिळवण्यात गेले.