Tuesday 18 January, 2011

कथा-पटकथा-संवाद

         मला बर्‍याच दिवसापासून असा प्रश्न पडायचा की चित्रपटामधील कथा-पटकथा-संवाद यामध्ये फरक काय.जसा जसा मी या गोष्टीचा अभ्यास करू लागलो तसा या गोष्टीचा गोंधळ कमी होत गेला.कथा म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा थोडक्यात परिचय. म्हणजे उदाहणार्थ लगान चित्रपट घेऊया याची कथा काय.तीन वर्षाचा लगान माफ व्हावा यासाठी एका इंग्रज  आणि भुवन ची क्रिकेट मॅचवर पैज लागते आणि ती मॅच भुवन जिंकतो व सार्‍या प्रदेशाचा तीन वर्षाचा लगान माफ होतो.लगान ची कथा एक ओळीत झाली.कथा एका ओळिपासून  8-10 ओळिपर्यन्त असु शकते.
       पटकथा म्हणजे थोडक्यात घटनाक्रम.8-10 दहा ओळिच्या कथेचा विस्तार पटकथेमध्ये होतो.पटकथा मध्ये फक्त घटनाक्रम अपेक्षित असतो.संवाद नाही. उदाहणार्थ:भुवन आणि त्याचे मित्र लपून क्रिकेट पाहत असतात.त्याना तो खेळ अनोळखी असतो.    ते खेळाबद्दल आपापले अंदाज  व्यक्त करू लागतात. तोच बॅट्समन ने मारलेला बॉल त्याच्याजवळ येतो. आणि वैगरे वैगरे अशी ही  पटकथा असते.संवाद हे पटकथे वरुन लिहिले जातात.कहिवेळेस पटकथा लिहिणारे वेगळे अणि संवाद लिहिणारे वेगळे असतात.पण प्रत्येक वेळेस पटकथा लिहिली जाते अस नाही. ते चित्रपटाच्या प्रक्रीये नुसार ठरते.कथा पटकथाकार आणि संवाद लिहिणारा जर एकच असेल तर बहुधा लेखक पटकथा न लिहिता प्रत्येक्ष संवाद लिहिण्यास घेतो.या संपूर्ण लिखाणाला फिल्म इंडस्ट्री मध्ये format  असतो.तो अभ्यासुनच  कथा-पटकथा-संवाद लिहायचे असतात.

No comments:

Post a Comment