Thursday 27 January, 2011

चाकोरीतले जीवन

तुझेच मन तुझेच अन्तरंग तुलाच फसवत आहे
मग कशास आशा जिंकण्याची, तूच तुला हरवत आहे

सामान्याच्याच  तू गर्दीतला गर्दीचाच तू भाग आहे
कशास उकडे तुला गर्दीतून ,तुझीच उष्णता तुला खात आहे

एकच दिनचर्या एकच रंग,याच रंगात तू भिजला आहे
कशास स्वप्न जागृत होण्याचे,ज्या स्वप्नात तू निजला आहे 

नित्यनियमाने जाता जाता एकदिवस मरण गाठायचे आहे
कशास भीती अशा मरण्याची ,तुझे जगणे तुला शोधायचे आहे

Tuesday 18 January, 2011

कथा-पटकथा-संवाद

         मला बर्‍याच दिवसापासून असा प्रश्न पडायचा की चित्रपटामधील कथा-पटकथा-संवाद यामध्ये फरक काय.जसा जसा मी या गोष्टीचा अभ्यास करू लागलो तसा या गोष्टीचा गोंधळ कमी होत गेला.कथा म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा थोडक्यात परिचय. म्हणजे उदाहणार्थ लगान चित्रपट घेऊया याची कथा काय.तीन वर्षाचा लगान माफ व्हावा यासाठी एका इंग्रज  आणि भुवन ची क्रिकेट मॅचवर पैज लागते आणि ती मॅच भुवन जिंकतो व सार्‍या प्रदेशाचा तीन वर्षाचा लगान माफ होतो.लगान ची कथा एक ओळीत झाली.कथा एका ओळिपासून  8-10 ओळिपर्यन्त असु शकते.
       पटकथा म्हणजे थोडक्यात घटनाक्रम.8-10 दहा ओळिच्या कथेचा विस्तार पटकथेमध्ये होतो.पटकथा मध्ये फक्त घटनाक्रम अपेक्षित असतो.संवाद नाही. उदाहणार्थ:भुवन आणि त्याचे मित्र लपून क्रिकेट पाहत असतात.त्याना तो खेळ अनोळखी असतो.    ते खेळाबद्दल आपापले अंदाज  व्यक्त करू लागतात. तोच बॅट्समन ने मारलेला बॉल त्याच्याजवळ येतो. आणि वैगरे वैगरे अशी ही  पटकथा असते.संवाद हे पटकथे वरुन लिहिले जातात.कहिवेळेस पटकथा लिहिणारे वेगळे अणि संवाद लिहिणारे वेगळे असतात.पण प्रत्येक वेळेस पटकथा लिहिली जाते अस नाही. ते चित्रपटाच्या प्रक्रीये नुसार ठरते.कथा पटकथाकार आणि संवाद लिहिणारा जर एकच असेल तर बहुधा लेखक पटकथा न लिहिता प्रत्येक्ष संवाद लिहिण्यास घेतो.या संपूर्ण लिखाणाला फिल्म इंडस्ट्री मध्ये format  असतो.तो अभ्यासुनच  कथा-पटकथा-संवाद लिहायचे असतात.

Thursday 6 January, 2011

अबोल प्रीत

कळून गेले सारे तरी बोलली नाही काही
वर्षे लोटली किती , पण परिस्थिती बदलली नाही

आम्ही वेडे खुळे  ,मागे लागलो का ग
तुच सांग आता, आम्ही मूर्ख का ग

लाज का वाटते आहे,प्रीत सांगण्याची
भीती का वाटते आहे,हृदय मागण्याची

तुला सांगण्याची ,भीती वाटते का ग
दे मला ग्वाही, पाहु वाट का ग

बंध का तोडत नाहीस ,मी वाट पाहत आहे
कधी येशील मिठीत  , स्वप्न मी सजवित आहे.


नाही बोलत माझ्याशी,घायाळ झालीस का ग
चिंब झालिस तू, अश्रुत न्हालीस का ग

वेळेचे ही बंधन तुजला , पाळायाचे आहे
कुठ पर्यंत वाट पाहु ,मरण्याचे श्वास आहे

वाट पाहण्याची ,कास धरतेस  का ग
प्रेम पडताळण्याची , परीक्षा घेतेस का ग

Wednesday 5 January, 2011

आम्ही मनाचे राजे

फिरुनी पाठ स्वप्नानी ,जगावयास आम्हा शिकवले
शिळे अर्थ लावूनि  ,भुलावयास आम्हा शिकवले

प्रयत्नाची कास धरली,हाती घेतली कामं
जगणे म्हणून जगणे झाले,नाही उरला राम

नशीब मानिले तर थट्टा आमची करता
काय ठावे तुम्हाला प्रश्न कसले विचारता

हळवी मन झाली आमची, परी फुटला ना त्याना पाझर
नको आहे ताप मज,केवळ यातनाचा इथे सागर

आज ना उद्या येईल असे, अर्थ शिकवतील जगण्याला
भाकित करितो आज जसे,जिंकून घेतील मरण्याला

पुरे पुरे आता, जगू द्या मजला माझे
काय पुसता आम्हाला ,आम्ही मनाचे राजे

आम्ही आनंदी कसे

काही ओघळती शब्द रडिचे ,आपसूक अश्रू मी प्यायचे
भाव आतला बाहेर नसे ,विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

सोहळे मांडले जखमाचे,नाही उघडे करतसे
चेहर्‍यावर माझे खोटे हसे, विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

आले लोक भेटायला,दुख बाजूला ठेवत असे
एकूण स्वर माझे ,विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

जानले न भाव  कुणी मनाचे,जानले मी सर्वाचे
दाखवया गेलो जेव्हा ,विचारती लोक तुम्ही आनंदी कसे

Tuesday 4 January, 2011

शोधीत होतो वाट जीवना

शोधीत  होतो वाट जीवना, अंधार डोळी दाटला
नाही मिळाला अर्थ जीवना, राग उदरी साठला

नाही अपेक्षा कसली, श्वास तो घेत होतो
का कळेना आस जीवाची ,आमरण जळत होतो

फूल बनूणी समोर आली, तीच माझी वहिवाट झाली
चालन्यास गेलो तेव्हा काट्याची बरसात झाली

बघत होतो चेहरे सारे ,दर्पण पाहणे राहीले
गीत जे झाले मनी ,तेच एकणे राहीले

Monday 3 January, 2011

हवालदिल बंडू काका

      
        बंडू काका नेहमी बोलायचे की मला एक सुंदर घर बांधायचे आहे.आणि खूप वर्षाची इच्छा ती या वर्षी पूर्ण झाली.बंडू काकांनी     फार सुंदर घर बांधले.एक पिक्चर ची शूटिंग यात करता येईल आणि एखादी हेरॉईन घराला बघून म्हणेल  " अय्या इतके सुंदर घर मी माझ्या आयुष्यात पहिले नाही "(या अलंकारा ला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात).बंडू काकांनी  घरात हव्या तितक्या सुख सुविधा  करवून घेतल्या.एखाद्या फिल्मी स्टाइल सारखा टाइगर नावाचा डोबरमँन कुत्रा पण पळून घेतला. या कुत्र्याचा आणखी एक उपयोग बंडू काका करतात तो म्हणजे नको असलेल्या पाहुन्याना घाबरवण्यासाठी!.
     सर्व गोष्टि नीटनेटक्या केल्या आहेत.बंडू काकांनी  किचन फार मोठा घेतला आहे.सुरुवातीला किचन फार रिकामा वाटायचा.खूप सारे भांडे असतानाही रूम च्या साइज़ मुळे तो रिकामा वाटायचा. बंडू काकांना ते सहन झाले नाही. किचन पूर्ण भरलेले वाटत नाही तोपर्यंत भांडे विकत घेऊन ते किचन मध्ये रचून ठेवले.ज्या वेळेस मी या किचन चा अवतार पहिल्यादा पहिला त्यावेळेस मला वाटले की बंडू काकांनी भांड्याच दुकान सुरू केला की काय!.लोक म्हैस घेतली म्हणून बादली विकत घेतात.पण इथे गोष्ट उलटी आहे बादली घेतली म्हणून म्हैस विकत घेतल्याचा प्रकार आहे.
      आज मी सहजच बंडू काका  कडे गेलो.काका चा चेहरा उदास होता. मी कारण खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला.पण काही केल तरी ते मला सांगत नव्हते.शेवटी मी काकूना विचारले तेव्हा मला सविस्तर माहिती मिळाली.
     दगडू पाटील शेजारी राहायला आले.शेजारच्याची विचारपूस करावी म्हणून घरी आले  होते.एवढे सुंदर घर पाहून ते पण भारावून गेले .त्यानी दारावरची बेल वाजवली.काका नि दरवाजा उघडला.   
      काका  उवाच " कोण आपण "
      दगडू पाटील उवाच " मी इथे शेजारी नवीन राहायला आलो.मला इथल्या मालकणा भेटायचाय"
      काका उवाच "हो मीच या घरचा मालक"
       दगडू पाटील " अहो इथल्या खऱ्या खुर्‍या मालकाला भेटायचाय"
      काका त्याना केविलवण्या पद्धतीने समजाऊ लागले पण दगडू पाटील समजण्याच्या  तयारीतच  नव्हते.हा वाद विवाद काकू नि एकला आणि त्या धावत पळत तिथे आल्या. आणि हेच या घरचे मालक आणि मी याची बायको अशी ओळख करवून दिली.नशीब काकुचा तरी त्यानी ऐकलं.
    दगडू पाटील उवाच "माफ करा हं मी तुम्हाला समजण्यात चुक केली. इतक्या मोठ्या घरचे  मालक असे  असतील  अस नव्हत वाटल ."
     त्या एकाच वाक्याचा जो काय काय अर्थ निघाला असेल ते मलाही मांडता येण शक्य नाही.घटना तशी मोठी नाही पण बंडू काकांनी तो आपला अपमान वाटला.म्हणून तर काय ते आज उदास होते.आणि न राहवून  बंडू काका बोलून गेले."सभवतालच्या गोष्टिना सुंदर बनवता बनवता मी त्याबरोबर स्वताला  बदलवण्याच राहून गेलो.घर तर सुंदर बांधले पण त्या घरात राहण्याच्या लायकी चा मी नाही राहिलो."   
    आज एक शिकावण मिळाली.आपणच बदलणारया ,घडवणारया  गोष्टीना देखील स्वताचे अनुकुलन हवेच असते.